मित्रांनो,
१५ ऑगस्ट १९४७,
लाखो वीरांनी प्राणाची आहुती देवून भारतमातेस ब्रिटीशांच्या जुलुमातून मुक्त केले. भारत पुन्हा उभा ठाकला, नव्या उमेदीने.....
साठ वर्षे संपून गेली, भारत स्वतंत्र झाला असला तरी अद्याप आपण मात्र गुलामच राहीलो आहोत!
सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्या भारताची बाजारपेठ काबीज करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. सुशिक्षित बेरोजगार अत्यल्प दरात कामगार म्हणून आणि इथला सधन वर्ग म्हणजे त्यांच्या पक्या मालासाठी तयार बाजारपेठ म्हणून! जणूकाही भारत हा केवळ 'ग्राहकांचा देश' आहे. राजकीय गुलामगिरी संपली परंतु अजूनही आपण आर्थिक गुलामगिरीच्या दुष्ट चक्रात अडकलेलोच आहोत. जागतिकीकरणाच्या माध्यमातून भारताला बहुराष्ट्रीय कंपन्यांचा Branded India बनवण्याचा डाव मांडलेला आहे!
आपल्याला हे चक्रव्यूह भेदायचे असेल तर राष्ट्रीय हिताच्या नव्या अर्थकारणाचे गणित मांडावे लागेल.
आपला
उमेश लोंढे
Hi Umesh,
ReplyDeleteCongratulations for your BLOG.
Wish you all the Best and hope for new and interesting thoughts from you.
Charulata
ब्लॉग जगतात स्वागत आहे.
ReplyDeleteइथे सेन्सॉरशीप नाही, दुसऱ्या कोणाचा संपादकीय वरचष्मा नाही, आणि वाचक मिळवायची जबाबदारी लेखकावरच आहे. पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण जबाबदारी हे नेहेमीच हातात हात घालून चालतात. हे स्वातंत्र्य तू enjoy करशील, आणि जबाबदारी निभावशील, याची खात्री आहेच.
शुभेच्छा.